माय मराठीवर अविरत अन्याय होत आहे.शासन दरबारी दूजाभाव होत आहे. या मातेची मुलेच तिचे लचके तोडताहेत!
वास्तविक मातृभाषेतील शिक्षणामुळे सजग,सक्षम पिढी तयार होते, हे संशोधनाअंती ही अधोरेखित झालेय.परंतू मराठीची परवड जीवघेणी होत आहे.
हि व्यथा घेऊन कण्हत बसण्यात काय हशील? वेळ निघुन जाण्याआधी काही करण्याची आणिबाणी आलीय.हाच दृष्टीकोन ठेवून ‘कुसुमाग्रज मराठी विचार मंच’ मराठी भाषाप्रेमी,लेखक,साहित्यिक,अभ्यासक,प्राध्यापक,शिक्षक,कलाकार,सामाजिक कार्येकर्ते व नागरिकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कृपया, सोबतचा गुगलफॉर्म भरून आपण सहभाग नोंदवावा.तसेच आपल्या परिचितांना ही आवाहन करावे.
लवकरच यासाठी एक विचार मेळावा आयोजित करित आहोत.तसेच आपले मत,अभिप्राय ही कळवावा हि विनंती.