नमस्कार! समाजात एखादा सकारात्मक बदल घडवायला सर्वात महत्वाची ठरते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा अनेकांनी हा चांगला बदल घडवण्यासाठी सातत्याने केलेली कृती, जी नंतर एखाद्या मोठ्या कार्यामधे रुपांतरीत होते. विचारातून कृती व कृतीतून,कार्य, कार्यातून चळवळ व त्यातून घडून आलेला सामाजिक बदल हा एक मोठा प्रवास आहे व तो अनेक खाच खळग्याने व आव्हानाने भरलेला आहे. अनेक चांगल्या व्यक्ती अतिशय उत्तम उद्देश व स्वप्न घेऊन सामाजिक कार्याचा श्रीगणेशा करतात, आत्यंतिक तळमळीने व जिद्दीने एखादा सकारात्मक बदल घडवायचा प्रयत्न करतात. सातत्याने आपले काम पुढे नेतात,यशस्वी होतात. अशा या संघर्षमय दिवसांमधेच खरी गरज असते ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची. त्यांना मदत करण्याची, आर्थिक, व्यावहारीक सल्ला मसलतीची, तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाची आणि केलेल्या कामाच्या प्रशंसेची, पाठीवरच्या शाबासकीची! त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी या करता पुढे केलेल्या मदतीच्या हातांची!
“सार्थक सेवा सन्मान” दरवर्षी मूलभूत सामाजिक समस्यांवर
काम करणाऱ्या व सकारात्मक शाश्वत व सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जाणार आहे. पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये व सन्मानपत्र अशी असेल.या शिवाय विशेष उल्लेखनीय पुरस्कर्त्यांना देखील,आर्थिक मदत, सन्मानपत्र व संस्थेच्या गरजेप्रमाणे आवश्यक मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे. दरवर्षी आँगस्ट महिन्यात सार्थक च्या वर्धापन
दिनाला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतील. या करता पुढील अर्ज लवकरात लवकर भरून पाठवा.
संपर्क :अर्चना- ८३९०६५००८० , मनीषा-९८५०७०४७७९, ऑफिस-९७६६०७८१४६