आळशी माणूस हा आरामाची अपेक्षा करत असतो. तर खरा काम करणारा माणूस ‘आराम हराम आहे’ असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतरवेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पहिजे की, काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणाहीसाठी थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला, तर आपला कार्यभार राहणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुटटी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे.
वरील परिच्छेद वाचा आणि पुढील प्रश्न सोडवा.